*अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा कोर्टाकडून रद्द!!
अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणार CET रद्द करण्याचा निर्णय घेत हाय कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे.28 मे रोजीचा सरकारने काढलेला अध्यादेश कोर्टाने रद्द ठरवला आहे.तसेच विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश करण्यात यावा असा आदेश कोर्टाने दिला आहे.CBSE,ICSE ,तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा CET अभ्यासक्रमाबाबत आक्षेप घेतला होता.त्यामुळे आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया 10 वीच्या गुणांच्या आधारेच केली जाणार आहे.
